Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केंद्राकडून कोरोनासाठी एक नवा पैसा नाही

Updated: बुधवार, 27 मे 2020 (13:23 IST)
 
नियोजन भवन येथे पत्रकार परिषदेत फडणवीस खोटे बोलत आहेत. वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. फडणवीस खोटे बोला, नेटाने बोला या युक्तीचा  अवलंब करत आहेत. केंद्राने दरवर्षीप्रमाणे राज्य आपत्ती व्यवस्थपनासाठी 2020-21 साठी 4296 कोटींचा निधी मंजूर केला आहे. यातील 40 टक्के निधी म्हणजे 1718.40 कोटींचा निधी हा राज्य आपत्ती व्यवस्थापन व रिसपॉन्ससाठी आहे. त्यानुसार सरकार राज्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी हा निधी खर्च करतो. या निधीत 75 टक्के निधी हा केंद्र सरकारचा आहे. या निधीतून पहिला हप्ता 1611 कोटी इतका निधी राज्य सरकारला मिळाला आहे. त्यातील 2020- 21 यावर्षी 35 टक्के निधी म्हणजेच 601 कोटी इतका निधी कोविडसाठी खर्च करण्याची परवानगी केंद्राने दिली आहे.
 
राज्य  सरकारने केंद्राकडे पाठपुरावा केल्यानंतर ही परवानगी मिळाली आहे. यातून कोविडसाठी राज्य सरकारने आतापर्यंत 171 कोटींचा निधी वितरित केला आहे. तर 156 कोटींचा निधी मंजूर करण्यास  राज्य कार्यकारी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. येत्या एक दोन दिवसात हा निधी दिला जाईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. कोविडसाठी आतापर्यंत एकूण 327 कोटी मंजूर केले आहेत. केंद्र सरकारने कोविडसाठी स्वतंत्र असा कुठलाही निधी दिला नाही. फडणवीस खोट बोलून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

अटल पेन्शन योजनेअंतर्गत दरमहा किती पैसे जमा करावे लागतात? येथे जाणून घ्या...

लाँग्सनिंग एफसीने ड्युरँड कप फुटबॉलमध्ये मुंबई एफसीचा पराभव केला

सरकारी कार्यालयात जाण्याची सक्ती संपली! महाराष्ट्र सरकारने 'प्रक्रिया पुनर्रचना' अंतर्गत पाच प्रमुख प्रशासकीय सुधारणा लागू केल्या

LIVE: अमरावतीमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार, ५७,००० हेक्टर पिकांचे नुकसान

आता नुकसान भरपाई द्यावी लागणार! नवी मुंबईतील हॉटेल परवाना निलंबन प्रकरणात उच्च न्यायालयाचा FDA ला दणका

पुढील लेख
Show comments